सुखाएवढं... "जीवनाला चाळणीत घेवून फक्त सुख का बाजूला काढतेयस...? दुःखाला पण सोबत घे... कारण खरं जीवन जगायला तेच शिकवत असतं... दुःख जवळ असल ना कि, माणसातला खरा माणुस ओळखता येतो.. नायतर मुखवटा लावून चांगली वागणारी ही माणसाची जात; उत्तम अभिनय करण्यात निष्णात आहे... दुखाबरोबर वावरत असताना आपण थोडेसे डोकावतो स्वतःतही... शोधू लागतो चुकलेल्या वाटा, आणि लपलेला आत्मविश्वासहि... कधी कधी होते यात अश्रुना वाट मोकळी.. होवू दे ना...चांगलं असतं... किती कुरूप दिसतो आपण यात; हे आपलं आपल्याला कळतं... म्हणून म्हणतो घे सोबत त्याला... किम्मत खऱ्या सुखाची कळण्यासाठी जरूरी आहे ते...सुखाएवढचं..." -अभि